महाजनांची अंधारेंवर खोचक टीका…काय तर बोलणच काढल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील राजकारणातील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारें हे दौऱ्यावर असतांना ते नेहमी प्रमाणे शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला बोल करीत आहे. तर दुसरीकडे मनसेच्या प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेत्या अंधारेंवर खोचक टीका केली आहे.

सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला. त्यांच्या मेंदूला नारू झालाय का, अशा विखारी शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केलीय. या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. त्यांना बोलायला ठेवले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिलीय. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी एका सभेत बोलताना मुंबईत शिवसेनेची सत्ता असताना मातोश्रीवर एक मजलाही चढला नाही. मात्र, दुसरीकडे कृष्णकुंजवर अर्पाटमेंट झाले असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले होते. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर अंधारेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, या बाईला काय बोलावे, आम्ही दोघे बीड जिल्ह्यातील आहोत. त्यांना बोलायला ठेवले आहे, भुंकायला ठेवले नाही. त्यांच्या मेंदूला नारू झालाय. आपल्या मालकाला विचारून त्यांनी बोलले पाहिजे अशी विखारी टीका त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावे, त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते असे म्हणत प्रकाश महाजन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही जातीच्या लोकांनाच पुढे केले जाते, हे उघड आहे, त्यात हातच्या कांगणाला विरोध कशाला असा सवालच महाजन यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम