विश्वचषकमध्ये कोणताही संघ बलाढ्य नाही : विराट कोहली

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३

पुणे विश्वचषक स्पर्धेत कोणताही एक संघ बलाढ्य नाही आणि जेव्हा क्रिकेटरसिक फक्त यशस्वी संघांवर अधिक लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्यांच्यासाठी काहीवेळा निकाल धक्कादायक ठरू शकतात आणि त्यामुळे निराशा वाढू शकते, असे मत भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली याने बुधवारी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

अफगाणिस्तानने इंग्लंडविरोधात आणि नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेविरोधात नोंदवलेल्या धक्कादायक विजयाबाबत कोहलीने हे मत व्यक्त केले. मात्र, गुरुवारी होणाऱ्या भारत-बांगलादेश सामन्याच्या पार्श्वभूमीवरही कोहलीच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर सलग तीन विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करण्यात भारताला यश आले आहे.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनविरुद्ध भारतीय संघाला सावध राहावे लागेल. गेल्या काही वर्षांत मी शाकिबविरुद्ध खूप खेळलो आहे. तो खूप अनुभवी गोलंदाज आहे. नवीन चेंडूवर फलंदाजाला अडकवण्याबरोबरच धावा रोखण्यातही तो सक्षम आहे, असे कोहलीने सांगितले. भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही कोहलीच्या या विधानाला सहमती दर्शवली. शाकिबसारख्या गोलंदाजाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागेल, आणि हे करण्यात अपयशी ठरल्यास फलंदाजांवर दबाव वाढेल आणि बाद होण्याची शक्यता वाढेल, असे पंड्या म्हणाला. दरम्यान, शाकिबने सांगितले की, कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला पाच वेळा बाद करणे, हे माझं भाग्य आहे. साहजिकच कोहलीची विकेट मिळाल्यावर मला खूप आनंद होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम