
शरद पवारांचे नेते करणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत !
बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ | राज्यातील गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये अख्ख राज्य मंत्रिमंडळ दाखल झालं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कारपेट टाकण्यात आलंय.
तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75 वं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यात मराठवाडा आणि संपूर्ण राज्यासाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.
पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 16, 2023
ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या या बैठकीवर भाष्य केलंय. राज्यात सध्या पाऊस होत नाहीये. अशात सरकारने दुष्काळ केलेला नाही. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं म्हटलंय. तशी बातमी पाहिली. तसं असेल तर त्याचं मी मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनंही पूर्ण केली जातील, अशी आशा व्यक्त करतो, असं जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम