जळगाव – एरंडोल महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या बस अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी तर दोन जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ श्री चौधरी ट्रॅव्हल्स (बस क्रमांक :एआर ०१ वाय ०००९) ही खासगी बस मुंबई-नागपूर महामार्गावर दुभाजकाला आदळून पलटी झाली आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर यात असून चालक ठार झाला आहे. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार (वय ३०), रतनलाल कुमावत (वय ४०), जयराम कुमार (वय ३२), महादेव कुमार (वय ४५), अनोळखी (वय ३०), अनोळखी हे गंभीर झाले आहेत तर राजेंद्र प्रजापती (वय ४५), सीताराम कुमार (वय ३५), मुकेश गुजर, लक्ष्मी जांगीड (वय ५०) हे किरकोळ जखमी आहेत. तर मृत चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही लक्झरी बस राजस्थानकडून जळगावमार्गे औरंगाबादकडे जात होती. पिंपळकोठानजीक एका छोट्या पुलाच्या कठड्यावर बस धडकली आणि खाली कोसळली. संततधार पावसाने चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम