पुरावे देण्यासाठी वेळ मागतोय पण टाळताय ; राऊतांचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  राज्यात ठाकरे गट आता आक्रमक पाहायला मिळत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, भाजपाचे आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री किरीट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. हे पुरावे देण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांना चार महिन्यांपासून भेटायची वेळ मागतोय. पण ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. याबद्दल त्यांनी एक पत्रही लिहिलं आहे.

 

देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात, असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!” देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय ? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम