सुषमा अंधारेंची मोदींसह शिंदे गटावर टीकास्त्र !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे गटासह भाजप नेहमी ठाकरे गटावर टीका करीत आहे यावर प्रतीउत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. शिंदे गटातील आणि भाजपमधील नेते गेली अनेक दिवस बाळासाहेब ठाकरे ही कुणाची खासगी मालमत्ता नाही ते महाराष्ट्राची मालमत्ता आहे असे म्हणत होते, यावरून सुषमा अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांना सत्ता, मालमत्ता या शिवाय काहीच दिसत नाही.

केंद्रात नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी ही नावे अशी आहेत की यांना पैसा, सत्ता, खुर्ची मालमत्ता, अधिकार, याच्याशिवाय आयुष्यात दुसरे काही दिसू शकत नाहीत. मुंबई लुटून खाण्यासाठी अधीर झालेल्यांना आता चक्क वंदनीय बाळासाहेब यांना मालमत्ता म्हणताना सुद्धा जेव्हा अजिबात थरथरत नाहीत. असा घणाघात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच नेतृत्व अमित शहा हे मातोश्रीच्या पायर्‍या का झिजवत होते. शाह यांना विचारा अपयशी नेत्याकडे कशाला सारखे येत होता. तुमच्यासोबत आल्याने आमच्या दहा जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते अपयशी आहेत. अशा शब्दात आशिष शेलार यांच्यावरही टीका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये येऊन मनपा निवडणुकीचा नारळ फोडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन अनेक आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले. एखाद्या माणसाने पाप केले किंवा गुन्हा केला तर त्याला कारागृहात टाकले जाते. अशी भीती फडणवीस यांना वाटते आहे काॽ भाजपच्या 15 लोकांना तपास यंत्रणा क्लीन चिट दिली असून स्वतःलाही फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. आदित्य ठाकरे यांना कारागृहात टाकण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न करण्यात आले याचे उत्तर द्यावे. फडणवीस यांनी कोणत्या गुन्ह्याची आपल्याला भीती वाटते त्यामुळे तुमचे मन तुम्हाला खाते आहे ते जनतेस सांगावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम