निलम गोऱ्हेच्या प्रवेशाचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हेंच्या यांच्या प्रवेशाचे खरे कारण सांगितले आहे.

शिवसेना भाजप युती किती मजबूत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. बाळासाहेब, अटलजी या सर्वांना अभिप्रेत असलेली युती आहे. राज्यात देखील शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन व्हावे ही जनतेची इच्छा होती. त्यामुळे वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस आणि मी कामांचा धडाका लावला. ज्याची चर्चा सगळीकडे होऊ लागल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 2014 ते 2019 मध्ये सरकार युतीचे होते. त्यावेळेला आम्ही महत्वाचे निर्णय घेतले. त्यानंतर सरकार गेल्याने सर्व प्रकल्प मागे पडले. पण आता आम्ही पुन्हा सत्तेत आल्याने लोकहिताचे बंद झालेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. हे निर्णय राज्याच्या समोर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकार स्थापन झाल्यानंतर विविध जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी, आमदार, खासदार येत आहेत. घटनात्मक पदावर काम करत असताना निलम गोऱ्हे यांनी इच्छा व्यक्त केली. महिलांच्या विकासासाठी काम करायचे असल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र म्हणजे आपले पालक आहेत. आज आपण जे प्रस्ताव पाठवतो ते मंजूर होतात. त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे समृद्धी, मेट्रो, जलसमृद्धी हे ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा सुरु झाले असल्याचेही ते म्हणाले. निलम ताई दुसऱ्या पक्षातून प्रवेश करत नाहीत. त्या शिवसेनेतच आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम