उद्धव ठाकरे शब्दाला जागले नाहीत ; पटेलांचा गौप्यस्फोट !

बातमी शेअर करा...

बातमीदार| ३ सप्टेंबर २०२३ | राज्यात महाविकास आघाडी स्थापनेवेळी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र अडीच वर्षे संपल्यानंतर उद्धव ठाकरे दिलेल्या शब्दाला जागले नाही म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वात बाहेर पडल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला.

अजित पवार गटाच्या वतीने देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नागपूर जिल्ह्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नाही म्हणून उद्धव ठाकरे आमच्याकडे आले. राष्ट्रवादी काँग्रेसने याकरिता काँग्रेसलाही आघाडीत येण्यासाठी राजी केले. शिवसेनेकडे आमच्यापेक्षा फक्त दोन आमदार अधिक होते. जेव्हा आपण राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन उद्धव यांच्याकडे गेलो तेव्हा ते या विषयावर काहीच बोलले नाही. साधा प्रतिसादसुद्धा दिला नाही, असे पटेल म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम