ठाकरेंना सर्वात मोठा धक्का कोणता : अमृता फडणवीसांचे ट्वीट व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड केल्यानंतर आता पक्षावरच दावा करण्यात आला आहे. हा सर्व वाद आता निवडणूक आयोगाच्या समोर सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ आणि पक्षाच नाव गोठवलं आहे. त्यामुळे राज्यातील विरोधक ठाकरे गटावर तुटून पडले असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

 

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता आहे. पहिला ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्याने, ४० आमदार आणि १२ खासदारांनी साथ सोडली, भाजपाशी असलेले संबंध तुटणे आणि अखेरचा हिंदुत्ववादी पक्षाची प्रतिमा पुसणे, असे प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारले आहे. त्यांच्या ट्विटला आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतं पहावे लागणार आहे.
दरम्यान, अमृता फडणवीसांनी यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ला केला आहे. तेव्हा त्यांना शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात आलं. मात्र, आता अमृता फडणवीस यांच्या ट्विटने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम