आरक्षणासाठी नववीच्या चिमुरडीने संपविले जीवन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते, त्यानंतर आता ते राज्यभर दौरे करीत आहे पण राज्यात अजून देखील आरक्षनासाठी आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होत नाही आहे. नुकतेच नांदेडच्या जवळच असलेल्या सोमेश्वर गावातील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे विद्यार्थीचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या नंतर तीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कोमलने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तिने लिहिले की, ‘मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझे बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई-अण्णा मला माफ करा’. जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु झालेल्या आंदोलनानंतर नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.

जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार आत्महत्या करु नका, असे आवाहन केले आहे. मात्र, तरी देखील राज्यातील आत्महत्या करण्याचे सत्र थांबलेले नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. तर त्यांच्या घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील चालवतात. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कोमल बोकारे हिने घरात सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने मराठा समाजाला लवकर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही बलिदान व्यर्थ जाऊ नये अशी मागणी देखील तिने केले आहे. त्यासाठी तिने आई आणि वडिलांची देखील माफी मागितली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम