मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला ; उपमुख्यमंत्र्यांनी सांगतिले मुख्यमंत्री घेणार निर्णय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यापासून मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधक सातत्याने टीका करीत होते पण आता मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलं असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस म्हणाले कि, जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार करताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, असा दावा केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. यात कोणतीही विश्वासार्हता नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम