गद्दारांनी आईच्या पाठीत खंजिर खुपसून निघाले ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  जागतिक गद्दार दिवस जाहीर करावा अशी मागणी राज्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून केली आहे. तसेच महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. ते मंगळवारी २० जून मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

“जगातील सर्वात मोठी गद्दारी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० लोकांनी गद्दारी केली. त्याचा काळा इतिहास सर्वांसमोर आहे. यापेक्षा मोठी गद्दारी जगात कधी झाली नाही. ज्या आईने पालनपोषण केलं, प्रतिष्ठा दिली त्याच आईच्या पाठीत खंजिर खुपसून गद्दार निघून गेले. यापेक्षा मोठी गद्दारी देशाच्या राजकारणात झाली नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. संजय राऊत म्हणाले, “आज मी संयुक्त राष्ट्राचे महासचिव, युनिसेफ, भारताचे पंतप्रधान कार्यालय सर्वांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र मी फार गांभीर्याने लिहिलं आहे. जगात फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन दिवस, योगा दिवस असे अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जगाला गद्दारांची आठवण करून देणारा जागतिक गद्दार दिवसही साजरा करावा, अशी मागणी मी केली आहे.”

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम