राज्यातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश : आंबेडकरांचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर गेल्या आठवड्यात ओरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिली होती. त्यांच्या या कृतीवर भाजपकडून टीका करण्यात आलेली. त्यानंतर आता आंबेडकर यांनी आपल्या कृतीमागचं खरे कारण काय आहे, ते सांगितले. तर त्यांनी मोठा दावा देखील केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील दंगली थांबविण्याचे काम मी केले आहे.

त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटही अडचणीत आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गाधीचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांना चांगलेच फटकारले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खून करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक कुणी कसं करु शकतो? असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

संभाजीराजे यांची ही भूमिका समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण औरंगजेबाच्या कबरीसमोर का झुकलो? याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी खूप मोठा दावा देखील केला. आपण औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आलं, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यावर आता इतर पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असा इतिहास आहे. औरंगजेबाने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहोचवली. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम